जावली तालुक्यात ३७ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध ; ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू
सूर्यकांत जोशी – जावली तालुक्यात आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले. यामुळे तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत. तर ३३९ उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.५९ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध आहेत.उर्वरित जागांवर ग्रामपंचायतीत प्निवडणूकिचे धुमशान सुरु झाले असून ५८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ८९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जावलीचे तहसीलदार पोळ यांनी दिली आहे.