Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीतील आपटी कन्टेमेंट झोन मुक्त

जावलीतील आपटी कन्टेमेंट झोन मुक्त

बुधवारी जावलीतील  पाच जण कोरोना संक्रमित

आपटीचे कन्टेमेंट झोन निर्बंध शिथील– मिनाज मुल्ला

      जावली कोरोना ६८/४  

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात बुधवारी सकाळी ओझरे येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला.तर रात्री उशीरा भणंग येथील 21 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला, धोंडेवाडी येथील 63 पुरुष, 57 वर्षीय पुरुष अशा चौघांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला. अशा प्रकारे बुधवारी एकूण पाच जणांचा अहवाल  कोरोना पाँसिटीव्ह आला असून जावलीतील कोरोना रूग्णांची संख्या ६८ आहे.तर चार जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

            दरम्यान तालुक्यातील आपटी या गावांत एक कोरोना संक्रमित रूग्ण आढळला होता.परंतु निर्धारित दिवसांत अन्य कोरोना संक्रमित रुग्ण या गावात आढळला नसल्याने मा.शरद पाटील सो.तहसीलदार  तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन जावली यांच्या अहवाला नुसार सदर गावचे कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर सातारा उपविभाग यांनी जारी केला आहे.यागावाला जिल्हाधिकारी सो. सातारा यांनी जारी केलेले कन्टेमेंट झोन बाहेरील निर्णय लागू राहणार आहेत.

            या सर्व पाचही रुग्ण मुंबई हुन आलेले आहेत.प्रशासन  आणि ग्रामपातळीवरील दक्षता समितीच्या कर्तव्यदक्षतेमुळे आज पर्यंत कोणत्याही गावात कोरोना संक्रमित रुग्णांची साखळी तयार झाली नाही. तहसीलदार शरद पाटील आणि गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग ,अंगणवाडी सेविका, आशा सेविका, व ग्रामदक्षता समिती असे चांगले टीमवर्क सुरू आहे. बाहेरील जिल्हयातून येणाऱ्यांना गावात येताच होमक्वारंटाईनचा केले जात असल्याने संसर्ग रोखणे शक्य झाले आहे.

                असे असले तरीही तालुक्यातील बाजारपेठांतील गर्दीवर आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मिळालेली सवलत म्हणजे आता कोरोनाचा धोका नाही असाच समज लोकांनी करून घेतलाय.सोशल डिस्टेन्सींग तर नावालाही कोणी पाळत नाही तर गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावता मिरवणारे अनेक जण आहेत. मास्क न वापरणारे इतरांना अनाहूत सल्ले देत आहेत. याकडे लक्ष वेधून नियम व कायदा मोडणारांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे.

         गेले दोन महिने जरी कडेकोट बंद पाळला असला तरीही तो कोरोना वरील उपचार नव्हता. सामाजिक अंतराचे भान ठेऊन व्यवहार करणे व मास्क वापरणे एवढेच फक्त उपाय आहेत हे जनतेने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page